मनोरंजन

सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे.; पाचव्या दिवशी ‘पठाण’ने किती कोटी कमावले?

अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा गेल्या पाच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा करत आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागला.

पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान मजल मारली. भारतामध्ये ‘पठाण’ सिनेमाने चार दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, तर जगभरात सिनेमाने तब्बल ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

दरम्यान ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटमुळे पाचव्या दिवसाच्या कमाईचा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यांनी एक ट्विट करत पाचव्या दिवशी सिनेमा किती कोटी रुपयांचा कमाई करु शकतो..याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारी सिनेमा ६० ते ६२ कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल… असं तरण आदर्श यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं.

पठाण सिनेमाची जादू फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील पाहायला मिळत आहे. जगभरात पठाण सिनेमाने ४२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार पाचव्या दिवसाची कमाई गृहीत धरली तर सिनेमा ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे.

‘पठाण’ ला मिळणार प्रतिसाद पाहून सिनेमाकडून चाहते आणि निर्मात्यांच्या आपेक्षा वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करतो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button