नांदेड (दि.19 मे 2024) :- बिड जिल्ह्यातल्या धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे दि.११ मे २०२४ रोजी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे टॉवर (मनोरा) तुटून पडल्याने या परिसरातील सिख सिकलकरी समाजाची ०९ ते १० घरे अक्षरशः उध्वस्त झाली तर या भयंकर घटनेत सिख सिकलकरी समाजातील एका ०८ वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले या मोडकळीस आलेल्या टॉवर संदर्भात भारत संचार निगम लिमिटेडला या परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन टॉवर हटवण्याची देखील मागणी केली परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने सदरील घटना घडली या अमानवीय घटने विरोधात हुजूर साहीब नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहीब गुरुद्वारा बोर्ड, बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच सिख समाजातील मान्यवरांनी धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथील घटनास्थळी भेट देऊन धारुरचे तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या ०८ वर्षीय मुलीच्या कुटुंबासह या घटनेतील नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
![](https://todayonelive.com/wp-content/uploads/2023/01/Untitled-11-copy.jpg)
तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहीब गुरुद्वारा बोर्ड, बाबाफतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच सिख समाजातील मान्यवरांकडून धारुरचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दि.११ मे २०२४ रोजी गोपालपूर धारूर या ठिकाणी बीएसएनएलचे टावर होते त्या टावरच्या बाजूला सिख सिकलकरी व इतर समाजाचे घर गेली अनेक वर्षापासून वास्तव्यास होते अंदाजे सायंकाळी ०६.०० वाजेच्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात वारा वावधान सुटल्याने बीएसएनएलचे टावर कोसळून सदरील ठिकाणच्या सिख शिकलकरी समाजाच्या वस्तीवर पडल्याने त्या ठिकाणचे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घरातील बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात मार लागून गंभीर जखमी झाले त्यापैकी तीन मुलांना गंभीर मार असल्याने शासकीय रुग्णालय आंबेजोगाई येथे दाखल करण्यात आले व बाकीच्या किरकोळ जखमींना धारूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.
![](https://todayonelive.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20240629-WA0011.jpg)
परंतु आंबेजोगाई येथील तीन गंभीर जखमी पैकी एका ०८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला व दोन मुल गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे वरील घटना गांभीर्याने पाहिल्यास सदरील ठिकाणच्या बीएसएनएल टॉवरमुळे त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांचे जीवितवाची आणि व घराची आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मयतास शासनाकडून 25 लाख रुपये जखमींना पाच लाख रुपये ज्यांचे पूर्णतः घर उध्वस्त झाली त्यांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये अशी आर्थिक मदत शासनाकडून मिळण्याकरिता आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून धारुरचे तहसिलदार यांना तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहीब गुरुद्वारा बोर्डाकडून देण्यात आलेल्या निवेदनावर अधिक्षक गुरुद्वारा बोर्ड नांदेड यांची तर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून देण्यात आलेल्या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांची तर नांदेड सिख समाज बांधवांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवक स. रविंदरसिंघ मोदी, ज्ञानी स. तेगासिंघ बावरी, स. बिरेंन्दरसिंघ बेदी, स. मनबीरसिंघ ग्रंथी, स. बलजीतसिंघ बावरी, सर. मनप्रीतसिंघ कारागीर, सर. अजयसिंघ, सर. तेजपालसिंघ खेड, सर. बक्षीसिंघ पुजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत…….