देश विदेश

मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला आयोजक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे आक्रमक

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.

 

12 लोकांचा जीव जाण्याला ‘हे’ जबाबदार

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मी आदर करतो. मात्र त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना राज्य सरकारने येणाऱ्या श्री सदस्यांसाठी केलेली उपाययोजना अत्यंत अपुरी होती. त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झालाय. सरकारने सध्या 12 जणांचा आकडा सांगितलाय. हा आकडा लपवला जातोय, अशी चर्चा आहे. कुणी म्हणतंय, 20 पर्यंत हा आकडा आहे. मी सरकारला आवाहन करेल, खरी बाब समोर येऊ द्या. 12 लोकांच्या जाण्याला सांस्कृतिक विभागातील संबंधिक अधिकारी, सचिव दोषी आहेत, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या हस्ते पुरस्कार का?

दरम्यान, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह्याच्या हस्ते पुरस्कार देण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार का दिला नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. या घटनेची जबाबदारी घेत संबंधित मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक, काँग्रेस मवाळ?

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबई येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. खारघर येथे सेंट्रल पार्कवरील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात उपस्थित 50 हून जास्त जणांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 12 जणांचा मृत्यू झालाय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आक्रमक झाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसने मात्र मवाळ धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय. मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, याची पुनरावृत्ती होऊ नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button