क्राईम

वाशिम मध्ये ३ विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; एकजण गंभीर जखमी

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. चाकूहल्ला करणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये एकजण गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र चाकूहल्ला का केला याचे कारण अस्पष्ट असून, त्या विद्यार्थ्यांचा कारंजा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान महाविद्यालयात चाकूहल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button