क्राईम

आधी कंपासमधील कटर ब्लेडने गळ्यावर वार, नंतर डोक्यात दगड घातला; दर्शना पवारच्या हत्येबाबत राहुलचा कबुलीजबाब

पुणे : दर्शना पवार खून प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून झाल्यानंतर अनेकांना राहुल हांडोरे याने नेमका खून कसा केला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून लग्नाच्या कारणावरुन त्यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यानंतर राहुलने रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा शरीरावर वार केले. कटरचा वार गळ्याला लागल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. यानंतर दर्शनाला दगडाने मारहाण करत तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे याने दिली आहे. मात्र, हे सगळे माझ्या हातून अनावधानाने घडले, असे राहुलने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ” मटा” ऑनलाइनला दिली आहे.

दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. १२ जूनला दोघेही राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून आले होते. असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पहायला मिळत आहे. तिचे लग्न ठरले होते की नव्हते, तसेच सीसीटीव्ही बाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याने खून कसा केला याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी कडून सांगण्यात आले.

दर्शना आणि राहूल एकमेकांना लहान पणापासून ओळखत होते. दोघेही पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होते. दर्शना हुशार असल्याने तिने mpsc परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पहिल्याच प्रयत्नात वनाधिकरी म्हणून काही दिवसात कामावृ रुजू होणार होती. मात्र राहुल याला परीक्षेत अपयश येत होते. तो डिलिव्हरी बॉय चे पार्ट टाईम काम करायचा आणि इतर वेळी mpsc चा अभ्यास करत होता.

दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी राहुल हांडोरेने काय-काय केलं?

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने पुण्यातून पळ काढला, तो वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान त्याने रेल्वेने प्रवास केला. पुण्यातून तो सर्वात आधी सांगलीत गेला. त्यानंतर तेथून त्याने गोवा गाठलं. त्यानंतर तो थेट चंदीगडला पोहोचला. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.

यावेळी राहुलने पोलिसांपासून कसं लपायचं याची सारी तयारी केली होती. त्याने त्याचा मोबाईल पूर्णवेळ बंद ठेवला होता, जेणेकरुन पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळू नये. जेव्हा गरज असेल तेव्हा तो नातेवाईक-मित्रांना फोन करायचा. पण, यावेळी त्याने खबरदारी घेतली. त्याने आपल्या फोनवरुन एकही फोन केला नाही. तर, प्रवासात सहप्रवाशांकडून फोन घेऊन त्याने संपर्क साधला. यादरम्यान, त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन केले. तो प्रवासात सहप्रवाशांच्या फोनवरुन तो कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना फोन करायचा. संपर्क झाल्यानंतर तो लगेच आपलं ठिकाण बदलायचा. जेणेकरुन पोलिसांना मिसलीड करता येईल आणि पोलिसांना त्याचं खरं लोकेशन कळणार नाही, याची काळजी राहुल हांडोरे सातत्याने घेत होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button