व्हीआयपी कल्चर मुळे नांदेडकर बेजार
नांदेड दि२४ मागील काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांनी नांदेड वर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे अनेक सत्ताधारी आणि संवैधानिक पदावर असलेले व्यक्ती नांदेडला सातत्याने भेट देत आहेत त्यामुळे या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने अनेक वेळा ट्रायल म्हणून कॉन्व्हाय निघत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा हकणात त्रास होत आहे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे अगोदरच रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत व वाहतुकीची कोंडी होत आहे.
आणि त्यामध्ये या व्हीआयपी कल्चरच्या नेत्यांच्या बडेजावासाठी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत अनेक रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत त्यामुळे एक प्रकारे दुष्काळात तेरावा महिना याचाच प्रत्यय नांदेडकरांना येत आहे अगोदरच खराब रस्त्यांमुळे व्यथीत असलेले नांदेडकर वारंवार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांमुळे अनेक वेळा वाहतुकीच्या समस्येला सामोरे जात आहेत यामध्येच मागील काही दिवसापासून शेजारील तेलंगाना राज्यातील सत्ताधारी पक्षांनीही महाराष्ट्रामध्ये आपली मुळे रुजवण्यासाठी नांदेड मधून सुरुवात केली आहे आणि त्या सत्ताधारी पक्षाचेही अनेक मेळावे नांदेडमध्ये होत आहेत आणि याचाही अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनावर देखील कार्याचा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त तणाव पडत आहे.
अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना सतत अनेक तास काम केल्यामुळे स्वास्थ संबंधित तक्रारींचा सामना करावा लागत आहे याशिवाय प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना देखील या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कार्याचा अतिरिक्त ताण पडून ते सुद्धा मानसिक तणावाला समोरील जात आहेत राजकीय नेत्यांनी एका शहरांमध्ये किती दौरे करावे याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिक पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा थोडा मोकळा श्वास घेता आला पाहिजे मागील अनेक दिवसांपासून होणाऱ्या सततच्या राजकीय सभा आणि नेत्यांच्या दौऱ्यांमुळे नांदेडकर बेजार आहेत यात मात्र शंका नाही.