शिक्षण

जालन्याचा नीट परीक्षेत पुन्हा डंका : पंक्चर बनवणाऱ्याच्या मुलीची उंच भरारी

जालना, 14 जून (प्रतिनिधी); मागील वर्षी शिफा फिरदौस युसुफोद्दीन आता जूना जालना येथील रहिवासी पंक्चर बनवणाऱ्याची मुलगी मिस्बाह अन्वर खान हिने गरीबीवर मात करत नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन 720 पैकी 633 गुण घेत जालन्याचे नावलौकिक मिळविला आहे. उर्दु हायस्कूलची ह्या विद्यार्थीनीने शिफानंतर परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही तास अगोदर ऑनलाईन नीटचा निकाल जाहीर झाला, गरीबीवर मात करत मिस्बाहने हे यश संपादन केले. सत्यपत्रकाशी बोलताना मिस्बाहने सांगितले की, कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना रात्रंदिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. एमबीबीएस डॉक्टर बनण्याची इच्छा आहे डॉक्टर बणून गरीबांची सेवा करायची आहे. उर्दू हायस्कूलचे प्राचार्य इफ्तेखार सर व शिक्षकांनी आणि अंकुश सरांनी नीट परीक्षेत मार्गदर्शन केले.

 

 

आई वडीलानी साथ दिली. अथक परिश्रमाने दहावी परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून तर बारावी बोर्ड परीक्षेत 86 टक्के गुण मिळविले. मिस्बाहला तीन बहिणी व दोन भाऊ आहेत. जूना जालना येथे वडील पंक्चरच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. अशा बिकट परिस्थितीत मुलीला उच्च निकाल जाहीर होताच नातेवाईक व जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. यशानंतर मुलींनी उच्च शिक्षणात पुढे यावे असे आवाहन मिस्बाहने केले आहे.

 

 

मागील वर्षी जालन्याची शिफा फिरदौस युसुफोद्दीन शेखने नीट परीक्षेत यश संपादन करुन औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस शिक्षण घेत आहे. अशाच प्रकारे मिस्बाहचे एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता साकार होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सत्यपत्रक नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आहे. बिकट परिस्थितीत मुलीला उच्च शिक्षणापर्यंत नेणाच्या पालकांचेही अभिनंदन, गरीबीवर मात करत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात पुढील शिक्षणासाठी मदत करावी असे आवाहन सत्यपत्रक करत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button