महाराष्ट्रा

प्रवासी घेऊन निघालेल्या धावत्या ‘शिवशाही’ने घेतला पेट; बस जळून खाक, अंगावर काटा आणणारा

नागपूर, 4 एप्रिल : नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या घटनेत बस जळून खाक झाली आहे.

ही बस 16 प्रवासी घेऊन नागपूरवरून अमरावतीकडे चालली होती. कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ अचानक या बसला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, मात्र आग लागल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालं आहे. बस जळून खाक झाली आहे.

बसमध्ये 16 प्रवासी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमधून ही शिवशाही बस अमरावतीकडे निघाली होती. या बसमधून एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही बस कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाब मंदिराजवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला.

मात्र प्रसंगावधान राखत प्रवासी खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण धावत्या बसने अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बसमधून उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनं पुन्हा एकदा शिवशाही बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button