अल्पसंख्यांक हक्क विषयक जाणीव जागृती झाली पाहिजे – प्रा.नदीम खान
नांदेड दि.18 देगलूर नाका येथील कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.नदीम खान यांनी अल्पसंख्यांक समाजातील सर्व घटकांचा विकास होण्यासाठी त्यांचे हक्क याविषयी जाणीव जागृती होणे आवश्यक आहे,तरच अल्पसंख्यांक वर्गाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उस्मान गणी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भूकतरे यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.नदीम खान अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात मागची भूमिका स्पष्ट केली.18 डिसेंबर 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघटने द्वारे हा दिवस अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या-त्या देशातील संख्यात्मक दृष्ट्या कमी असलेला वर्ग आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे विशेष प्रयत्न केले जातात. भारतात मुस्लिम, सिख, ख्रिश्चन,बौद्ध या अल्पसंख्यांक समाजाला विकासाची संधी मिळावी यासाठी शिक्षणाचा अधिकार, घटनात्मक अधिकार,आर्थिक सक्षमीकरण,महिला सक्षमीकरण,समान संधी,कायद्यांतर्गत सुरक्षा,मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण,नियोजन प्रक्रियेत सहभाग यासाठी प्रयत्न केले जातात व याद्वारे अल्पसंख्यांक घटकांचा देखील सर्वांगीण विकास करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.या अनुषंगाने प्रा.नदीम यांनी सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.सय्यद सलमान यांनी केले तर आभार प्रा.शेख नजीर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.मारुती भोसले,प्रा.बी.एस.भुक्तरे,प्रा.निजाम,प्रा.अतिफुद्दीन,प्रा.दानिश,श्री.रब्बानीसर,प्रभावती नवसागरे,अक्षय हासेवाड,मोहम्मद मोहसीन, गौस खान,आयेशा बेगम,मोहम्मदी बेगम, सुरेखा कोमटवार आणि क्रीडा खेळाडू यांची विशेष उपस्थिती होती.